पालिकेने केडीएमटीला दिलेले १ कोटी रुपये सभापतींनी नाकारले …
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२६ – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा परिवहन उपक्रम हा पांढरा हत्ती असल्याची टीका स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी केली होती. आता केडीएमटी हा पालिकेचा भाग नसल्याचे पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या भूमिकेवरून दिसून येत आहे. दर महिन्याला केडीएमटीवर साडे तीन कोटी रुपये खर्च होतो. यातील पालिका प्रशासनाने १ कोटी ३५ लाख रुपये केडीएमटीला देणे आवश्यक आहेत. मात्र या महिन्यात केडीएमटीला आयुक्तांनी १ कोटी रुपये दिल्याने परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के यांनी नाराजी झाले. परिवहन व्यवस्थे चालवण्यास पुरसा नाही असे म्हणत १ कोटी रुपये नाकारले. परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के आणि सदस्य संतोष चव्हाण यांनी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील परिवहन कार्यालयात अचानक भेट दिली.
यावेळी म्हस्के आणि चव्हाण यांनी बसचालक आणि वाहक यांच्याशी चर्चा केली.यावेळी वाहक आणि चालकांनी परिवहन व्यवस्थेतील त्रुटींचा पाढाच वाचला. यानंतर म्हस्के यांनी परिवहन समिती डबघाईला कशी आली आहे याची माहिती दिली. ते म्हणाले, केडीएमटीच्या ११८ बसेस असून त्यातील फक्त ४० ते ४५ बसेस रस्त्यावर धावतात. यातील १० व्होलो बसेस असून त्यापैकी फक्त तीन बसेस रस्त्यावर धावतात. परिवहन उपक्रमाचे दिवसाला उत्पन्न ४ लाख रुपये आहे असून महिन्याला १ कोटी २० लाख रुपये उत्पन्न आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारावर १ कोटी ६० लाख रुपये, डीझेलवर ८० लाख रुपये आणि पीएफ आणि मेंटेनन्स असा एकूण सव्वा ३ कोटी रुपये खर्च होतो. याचा परिणाम केडीएमटीच्या उत्पन्नावर झाल्याने ठेकेदारानाची बिले पेंडिंग राहतात.
दुरुस्तीला गेलेल्या बसेस सर्विस सेंटर मधून बाहेर पडू शकत नाही.केडीएमटी हा पांढरा हत्ती असून याला पालिका प्रशासनाची योग्य साथ मिळत नाही असेही म्हस्के म्हणाले. तर सदस्य संतोष चव्हाण म्हणाले,उत्पन्न कसे वाढवता येईल चर्चा केली. केडीएमटीचे उत्पन्न घटण्यामागे फक्त प्रशासन जबाबदार नाही तर पालिका प्रशासन आरटीओ आणि वाहतूक पोलीसही जबाबदार आहे. पाठिंबा मिळत नाही.सदस्य आपल्या परीने काम करतोय. अनधिकृत रिक्षा थांबे त्याच्यावर कारवाई होत नाही. डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौक हे रिक्षा थांब्यासाठी हा चूक आहे असा प्रश्न पडतो. पालिकेकडे अपेक्षा असते कि आम्ही कमी पडलो तर हातभार लावावा. तर दुसरीकडे पालिका हद्दीत केडीएमटीचे उत्पन्न घटण्यावर शहरातील अनधिकृत रिक्षा थांबे जबाबदार असून अश्या थांब्यावर रिक्षा उभ्या करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास केडीएमटीच्या अधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांची भेट घेतली असता आधी बसेस वाढवा असे उत्तर देण्यात आले. या कारणामुळे परिवहन व्यवस्था भविष्यात खाजगीकरणाकडे वळेल असे दिसून येत आहे.
१ ) एका वोल्वो बसेसच्या दुरुस्तीचे बिल तब्बल आठ लाख रुपये ….
परिवहन उपक्रमात २०१५ साली १० वोल्वो बसेसच्या दाखल झाल्या. कल्याण ते नवी मुंबई आणि डोंबिवली ते नवी मुंबई या मार्गावर वोल्वो बसेस धावतात. या बसेसचे तिकीट प्रत्येकी ६५ रते ७० रुपये आहे. या बसेसचे महिन्याला उत्पन्न सुमारे ९ लाख रुपये होते. मात्र आता मेंटेनन्स आणि दुरुस्तीसाठी यापैकी फक्त ३ बसेस रस्त्यावर धावतात. त्याचे महिन्याला उत्पन्न १ ते दीड लाख रुपये झाले आहे. वसई येथील सर्विस सेंटर येथे ३ वोल्वो बसेस दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. यातील एक बसेसचे ६० हजार, दुसऱ्या बसेसचे ४० हजार आणि तिसऱ्या बसेसचे तब्बल ८ लाख रुपये बिल झाले आहे. मात्र परिवहन व्यवस्थेकडे या बसेसच्या दुरुस्तीचे बिल भरले नसल्याने या बसेस रस्त्याव धावू शकत नाही.
२ ) डेपोत पालिकेच्या वाहनांत डीझेल भरण्याचे बिल ४७ लाख रुपये ..
पालिकेची सर्व वाहने डीझेल भरण्यास परिवहन व्यवस्थेच्या गणेश घाट येथील डेपोत जातात. या महिन्यात याचे ४७ लाख रुपये बिल झाले आहे. पालिका प्रशासनाने यापैकी फक्त ३० लाख रुपये भरले आहे.अजून १७ लाख रुपये बिल भरणे बाकी आहे. अश्या प्रकारे केडीएमटीवर परिमाण होत असून पालिका आयुक्तांनी याकडे लक्ष दिले पाहिजे असे सभापतीन सुभाष म्हस्के यांनी सांगितले.
३ ) कल्याण- डोंबिवली बसे सेवा बंद
दिवसाला साडे तीन हजार रुपये उत्पन्न मिळत असलेल्या कल्याण-डोंबिवली मार्गावरील बस सेवा काही महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. पुन्हा हि बस सेवा सुरु करावी अशी मागणी नागरिक करत असून वाहक आणि चालकहि मान्य करतात.मात्र पुन्हा या मार्गावर बस सेवा सुरु केल्यास पूर्वीप्रमाणे प्रवासी मिळण्यास कमीत कमी ३ महिने लागतील असे एका बसवाहकाने सांगितले.