देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्नं विद्यार्थी पुर्ण करु शकतात – राज्यमंत्री रवींद्र चव्हाण
डोंबिवली – दि. २९ ( प्रतीनिधी )
युवकांच्या हातात ताकद आहे. त्यांच्यातील बुध्दीमतेमुळे देशाचे सामर्थ्य वाढू शकते. विद्यार्थ्यांतून प्राध्यापक – शास्त्रज्ञ देशाला प्राप्त होऊ शकतात. देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्नं विद्यार्थी पुर्ण करु शकतात असे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात केले.
श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळाच्या वतीने मंदिराच्या प्रांगणात एस. एस. सी. मार्गदर्शन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्यमंत्री चव्हाण बोलत होते. व्याख्यानमालेचे हे एकविसावे वर्ष आहे. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री रवींद चव्हाण चव्हाण,आमदार सुभाष भोईर, शिवसेना महाड संपर्क नेते सदानंद थरवळ, नाशिक संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, उपाध्यक्ष रतन म्हात्रे, सचिव पंढरीनाथ पाटील इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ना.रवींद्र चव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद लक्षात ठेवले पाहिजे. ते म्हणत असत की, प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. तुम्ही किंवा तुमच्या पालकांनी जे ध्येय निश्चित केले आहे त्या ध्येयाच्या दिशेने झपाटले सारखे चालत रहा. ग्रामीण भागातील एकवीस वर्षांपूर्वीची शिक्षण मिळण्याची स्थिती चांगली नव्हती. त्यातून या व्याख्यानमालेचा उदय झाला.राज्यसरकारच्या वतीने एस एस सी ची परिक्षा सोपी झाली आहे. तसेच दुबार परिक्षेची सोय देखील आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीतून सोडवण्यासाठी फडणवीस सरकार कडून ईबीसी ची योजना राबविण्यात येत आहे. युवकांच्या हातात ताकद आहे , त्यांच्यातील बुध्दीमतेमुळे देशाचे साम्यर्थ वाढू शकते. विद्यार्थ्यांतून प्राध्यापक – शास्त्रज्ञ देशाला मिळू शकतात. देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्नं विद्यार्थी पुर्ण करु शकतात. यावेळी आमदार सुभाष भोईर होते ते म्हणाले, गुरुजींनी दिलेल्या ज्ञानामुळे आपण पुढे जजाऊ शकतो. ज्ञानाची तिजोरी महत्वाची आहे , पैसा नव्हे तर शिक्षण हिच संपत्ती आहे. ध्येय चिकाटी मुळेच आम्ही आमदार झालो. विविध शाळेतील सुमारे बाराशे विद्यार्थी व्याख्यानमालेच्या शुभारंभास उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे आभार पंढरी पाटील यांनी मानले.
——————- ( सोबत फोटो जोडले आहेत ) ———————————